◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

जीवनावर गहन सत्य सांगणारी अशीच एक माझी कविता
उद्याा काय होणार कोणास माहीत    ।
आज जे आहेत ते उद्यास नाहीत   ।।धृ ।।

माणसा जीवन हे विशिष्ट  ।
क्षणोक्षणी त्यात कितीतरी कष्ट ।।
त्या कष्टास चल तू सोशीत ।।१।।

 जीवन हे एक दुःखाचा बाजार ।
सुख  लोभाचा रे त्यास आजार ।। 
त्या आजारास चाल तू विसरित ।।२।।

 जीवन सुख दुःखाचा खेळ 
क्षणोक्षणी संपते येते वेळ 
वेळेचे जाणुनी घे हित ।।३।।

एकदाच येते हे जीवन ।
वाग सर्वां सोबत आनंदानं ।।
आनंदात राहा गात गीत ।।४।।

जसं दिल देवान जिवन ।
तसं तोच देईल मरण ।।
मरणास नको जाऊ तू भीत ।।५।।

-©arjun apparao jadhav


कविता कशी वाटली कमेंट मधे नक्की लिहा ...

🔴🔷🔴🔷🔴🔷🔴🔷🔴🔷🔴🔷🔴🔷🔴

Comments

Post a Comment

Did you like this blog

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◾ललित लेख :- स्ञी

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...