जिवन विचार - 108

दूध आणि पाणी एकत्र मिसळले असता त्यातील फक्त दूध प्राशन करणे आणि  पाणी टाकून देणं हा अत्यंत दुर्लभ गुण राजहंसाजवळ आहे.हा गुण मानवी मनाला मोहीत करून सोडतो.
  
       तसं पाहील तर राजहंस आणि  बगळा या दोन्ही पक्षांचा  रंग पांढरा असतो , परंतु दोघांच्या स्वभावधर्मात जमीन-आसमानचा फरक आहे.

  चांगल्याची निवड करणारा हंस कुठं  आणि  एका पायावर  उभा राहून क्षणात मासा गिळकृंत करणारा बगळा कुठं ? रंगाने सारखे असलेले हे दोन पक्षी स्वभावानं मात्र भिन्न आहेत .

या जगात गुण-दोष असलेली असंख्य माणसं आढळतात. माणसांच्या ठिकाणी असलेले गुण घ्यावेत  आणि अवगुण टाकून द्यावेत.
जीवनात माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर नीरक्षीरविवेक बुद्धी बाळगली पाहिजे. समाजात वावरताना हंस आणि बगळे निवडता आले पाहिजेत. म्हणून अनुभवाच्या कसोटीवर माणसं पारखून घ्यावी लागतात.


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे | Marathi Ukhane For Bride

कवि सुरेश भट यांची एक सुंदर कविता