माहिती जाणून घेऊ सप्त ऋषींची - धर्म

आज पर्यंत आपण सप्त ऋषींचे नावच ऐकत आलो आहोत. आज आपण त्यांचा बद्दलची माहिती जाणून घेऊ या.. कोण कोण आहे हे सप्तर्षी...
1 ऋषी वशिष्ठ - 
ऋषी वशिष्ठ अयोध्याचे राजा दशरथाचे कुलगुरू तसेच त्यांचे चारही मुलं श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नचे गुरु होते. ह्यांचा सांगण्यावरूनच दशरथाने आपल्या चारही मुलांना ऋषी विश्वामित्रांच्या बरोबर असुरांचा संहार करण्यासाठी आश्रमात पाठविले. अशी आख्यायिका आहे की कामधेनू गायीच्या प्राप्तीसाठी गुरु वशिष्ठ आणि गुरु विश्वामित्रांमध्ये युद्ध झाले होते.
2 ऋषी विश्वामित्र -
ऋषी बनण्यापूर्वी विश्वामित्र एक राजा होते. ते ऋषी वशिष्ठांची कामधेनू गायीला स्वतःच्या तावडीत घेण्याचा प्रयत्नात होते आणि तसं त्यांनी प्रयत्न देखील केले. त्यांनी युद्ध केले आणि ते त्या युद्धात पराभव झाले. या पराभावाने ते तप करण्यासाठी प्रवृत्त झाले. तप करण्याचा वेळी त्यांची तपश्चर्या इंद्रलोकाच्या एका अप्सरेने मेनकाने भंग करण्याचा प्रयत्नही केला. विश्वामित्रांनी एका नव्या स्वर्गाची स्थापनाही केली होती. चमत्कारी आणि सर्वात प्रभावी गायत्री मंत्राची रचना देखील ऋषी विश्वामित्राने केली आहे.
3 ऋषी कण्व -
हे वैदिक काळाचे ऋषी आहे. ऋषी कण्वने यांनी आपल्या आश्रमात हस्तिनापुराचे राजा दुष्यन्तची बायको देवी शकुंतला आणि त्यांचा मुलगा भरत यांचे सांभाळ केले होते. भारत देशाचे नाव या भरत च्या नावांवरूनच ठेवले गेले आहे. ऋषी कण्व हे लौकिक ज्ञान - विज्ञान आणि अनिष्ट निवारणासाठीचे असंख्य मंत्रांचे रचयिते आहे.
4 ऋषी भारद्वाज - 
वैदिक ऋषींमध्ये ऋषी भारद्वाजांचे उच्च स्थान आहे. गुरु बृहस्पती यांचे वडील आणि देवी ममता यांची आई होती. श्रीरामाच्या जन्माच्या आधी यांचे अवतारण्याचे उल्लेख आहे. कारण वनवासाच्या काळात श्रीराम ह्यांचा आश्रमात गेल्याचे म्हटले आहे. भारद्वाज ऋषींनी अनेक वेदमंत्रांची रचना केली आहे. त्यांनी भारद्वाज स्मृती आणि भारद्वाज संहिता रचिल्या आहे. 
5 ऋषी अत्री -
ब्रह्मदेव यांचे पिता, सोमदेव यांचा मुलगा आणि कर्दम प्रजापती आणि देवी देवहूती यांची कन्या देवी अनुसूयाचे पती होय. एका आख्यायिकांचा अनुसार एकदा ऋषी अत्री बाहेर गेलेले असताना त्रिदेव मुनींच्या रूपात यांचा आश्रमात भिक्षा मागण्यास आले होते. देवी अनुसुयाने देवी सीतेला पतिव्रता धर्माची शिकवणी दिली होती. ऋषी अत्री आणि देवी अनुसूया चंद्रमा, मुनी दुर्वासा आणि भगवन दत्तात्रेयांचे आई वडील असत.
6 ऋषी वामदेव - 
संगीताची उत्पत्ती वामदेव यांनी केली आहे. असा उल्लेख केला जातो. हे ऋषी गौतमाचे पुत्र होते. भरत मुनीने रचिल्या भरत नाट्य शास्त्र हे सामवेदांकडूनच प्रेरित असल्याचे समजते. सहस्त्रवर्षां पूर्वीचे रचलेल्या सामवेदामध्ये संगीत आणि सर्व वाद्य यंत्रांची माहिती मिळते.
7 ऋषी शौनक - 
पुरातन काळात दहा सहस्र विद्यार्थ्यांचे गुरुकुल याच ऋषीने निर्मित केले होते. ह्यांना कुलगुरू होण्याचा मान मिळाला आहे. प्रथमच कोणा गुरूस हा सन्मान प्राप्त झाल्याचे समजते. अनेक मंत्रांचे हे रचयिते आहे.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे | Marathi Ukhane For Bride