जिवन विचार - 144


☝कमीपणा घ्यायला शिकलो
      म्हणून... आजवर खूप
      माणसं कमावली...
      हिच आमची श्रीमंती...!!

 ☝नाते सांभाळायचे असेल तर
      चुका सांभाळून घेण्याची
      मानसिकता असावी ...
      आणि
      नाते टिकवावयाचे असेल तर
      नको तिथे चुका काढण्याची
      सवय नसावी ...

☝ताकद आणि पैसा हे
     जीवनाचे फळ आहे.
     परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम
     हे जीवनाचे मूळ आहे.

☝तुमच्या पाठीशी किती जण
     आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही
     किती जणांच्या पाठीशी आहात
     याला महत्त्व आहे.
   
☝"एखादे संकट आले की,
     समजायचे त्या संकटाबरोबर
     संधी पण आली.
     कारण संकट हे कधीच
     संधीशिवाय एकटा प्रवास
     करत नाही.
     संकट हे संधीचा राखणदार
     असते. फक्त संकटावर मात
     करा, मग संधी तुमचीच आहे".

 ☝"वडाचे झाड कधीच पडत
       नाही, कारण ते जेवढे वर
       वाढते तेवढेच ते जमिनीखाली
       पसरते. जीवनात तुम्हाला
       जर पडायचे नसेल तर स्वत:
       चा विस्तार वाढवतेवेळी
       चांगल्या मित्रांची सोबत
       वाढवा".

☝आयुष्यात  सुई  बनून रहा.
     कैची  बनून राहू नका. कारण
     सुई  दोन  तुकड्यांना  जोडते,
     आणि  कैची एकाचे  दोन
     तुकडे  करते...
__________________________________


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

जिवन विचार - 90

जाणून घ्या लग्न झाल्यानंतर मुलाच्या आयुष्यात होणारे बदल -जीवनशैली /Lifestyle