◼️ कविता :- महाभारत अजून चालू आहे...


🔸आपुलकी🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖
महाभारत अजून चालू आहे
फक्त पात्र बदलले आहेत
जीवन संघर्षाच्या नाटकातले
फक्त मुखवटे बदलले आहेत

दिसतील घायाळ अश्वत्थामा 
दुःख उरात घेऊन फिरताना
किती तरी मिळतील भीष्म
केवळ वाचनासाठी जागताना

आजही सर्वत्र दिसतात कर्ण
नियतीने क्रुर सूड उगवलेले
आपल्याच मनातून खचलेले
वाईट संगतीने वाट चुकलेले

स्वार्थी दुर्योधन ही आहेतच
आपल्यात भांडण लावणारे
दोन चार इंच जमिनीसाठी 
नातेसंबंधांचा ही जीव घेणारे

जीवन मोठं संघर्षमय आहे 
इथे प्रत्येकालाच लढायचयं
चक्रव्यहातल्या अभिमन्यूला
मायेने धीरानेच सोडवायचंय

इथे एकाकी पडलेत सर्वच
एक दुसऱ्याची गरज आहे
राज्य महाराज्य नको आता
जराशी आपुलकी हवी आहे

काळ बदलला वेळ बदलली
आता तुम्ही ही थोडे बदला हो
महाभारताचा बोध घेऊनी त्या
आपल्यात आपुलकी वाढवा हो

         

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

वाचनीय 100 पुस्तकांची यादी

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

कविता :- शाळेस निरोप | अनिकेत कैलास मोरे