मनाची शुद्धता - बोधकथा

पांडवांचा युद्धात विजय झाला. पूर्वी आपल्या हातून झालेली पापे नाहीशी करण्यासाठी व मनःशुध्दीसाठी त्यांनी तीर्थस्थानांची यात्रा करण्याचे ठरविले.

श्रीकृष्णाला सांगण्यासाठी व त्याची संमती घेण्यासाठी सर्व पांडव त्याच्याकडे गेले.

श्रीकृष्ण म्हणाला, “जात आहात तर जा. परंतु...मी तुम्हाला बरोबर न्यायला एक कडुनिंबाची फांदी देतो. तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तेथे तिला पण स्नान घाला."

पांडव त्यानंतर भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांवर स्नान करण्यासाठी तीर्थयात्रेला गेले.

तीर्थयात्रेहून परत आल्यावर सर्व पांडवांनी श्रीकृष्णाची भेट घेतली व त्यांची फांदी त्याला परत करत ते म्हणाले,

“आठवणीने सर्व क्षेत्रांवर तिला स्नान घातले."

श्रीकृष्णाने सुरीने फांदीचे तुकडे करून सर्वांना खावयास दिले व म्हणाला,

 “प्रसाद गोड आहे का ते जरूर सांगा."

सर्वांनी तुकडा तोंडात टाकल्यावर तोंड एकदम कसेसेच केले.

कारण प्रसादाची चव कडूच होती. 

श्रीकृष्णाने विचारले, "सर्व तीर्थक्षेत्रांमधे स्नान करूनही कडूनिंबाची चव गोड झाली का?"

“कशी होईल? स्नान घालून बाह्य बदल होईल. आतला कडूपणा कसा जाईल?"
धर्मराजाने प्रश्न केला.

श्रीकृष्ण म्हणाला,
“तेच समजावून सांगण्यासाठी मी ही डहाळी तुमच्याबरोबर दिली होती.
तीर्थस्नानाने शरीर शुद्ध होईल परंतु मनशुध्दी किंवा आत्मशुध्दी कशी होईल? त्यांचा संबंध
सदाचरणाशी, सद्गुणांशी आहे."
तात्पर्यः
मनशुध्दीसाठी ज्ञान, सदाचार, सेवा, सत्त्वगुण यांनी सुस्नात व्हावे ..
तीर्थस्नानाने नव्हे. 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे | Marathi Ukhane For Bride